---Advertisement---

मोहन भागवत यांचे विधान : भारताला जग त्याच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी नाही तर…

By team
On: August 9, 2025 4:07 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

जग भारताला त्याच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी नाही तर त्याच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी ओळखते. भारत इतर देशांना मदत करतो, म्हणून आपला देश महान आहे. भारत सर्वांसोबत आनंद वाटतो. तसेच, सर्व देश भारताला आध्यात्मिक ज्ञानावर विश्वगुरू मानतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूरमधील एका शिव मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत पुढे म्हणाले की, भारत लवकरच ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनेल, ही मोठी गोष्ट नाही. चीन, अमेरिका सारख्या इतर देशांनी हे आधीच साध्य केले आहे. अमेरिका आणि चीनसह या जगात अनेक श्रीमंत देश आहेत. परंतु भारतासारखे अध्यात्मिक ज्ञान कोणत्याही देशाकडे नाही. अर्थव्यवस्था देखील महत्त्वाची आहे पण भारत केवळ आध्यात्मिक ज्ञानाच्या आघाडीवरच जागतिक नेता बनू शकतो. जेव्हा आपण आपले सर्व सण आनंदाने साजरे करतो, आपल्या संस्कृतीचे योग्यरित्या पालन करतो, तेव्हा आध्यात्मिक ज्ञान वाढू शकते.

भागवत पुढे म्हणाले की, आपण आपला चांगुलपणा इतरांसोबत वाटला पाहिजे. आपण भगवान शिवासारखा त्याग केला पाहिजे. वाईट स्वतःपुरतेच ठेवले पाहिजे. तसेच, जग सध्या बदलाच्या काळातून जात आहे. अशा परिस्थितीत, व्यक्तीने योग्य वेळी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!