नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील प्रयागराज येथे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आज महाकुंभ २०२५ मधील पहिले शाही स्नान आहे, ज्याची सुरुवात प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेला भजन आणि कीर्तनाने झाली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने, विविध आखाड्यांमधील नागा साधूंनी संगमात पवित्र स्नान केले, ज्याला ‘अमृत स्नान’ (शाही स्नान) म्हणतात.
हा महाकुंभ १२ वर्षांनंतर आयोजित केला जात आहे, संतांचा दावा आहे की या कार्यक्रमासाठी १४४ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ मुहूर्त तयार करण्यात आला आहे, जो समुद्र मंथन दरम्यान तयार करण्यात आला होता. १२ वर्षांनंतर आयोजित करण्यात येणारा महाकुंभ १३ जानेवारी रोजी सुरू झाला आणि २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल. ४५ दिवस चालणाऱ्या या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला ४५ कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या मते, यावेळी महाकुंभात १५ लाखांहून अधिक परदेशी भाविक येण्याची अपेक्षा आहे.
महाकुंभात एकूण सहा स्नान होणार आहेत. यामध्ये तीन शाही (अमृत)स्नानांचा समावेश असणार आहे. अखाड्यातील साधू शाही स्नान करतात. पहिले शाही स्नान मकर संक्रातीदिनी (14 जानेवारी) होत आहे. दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येला 19 जानेवारी तर तिसरे शाही स्नान वसंत पंचमीला 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.