---Advertisement---

कॉंग्रेसची देशभक्तीची भावना संपली ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल !

By team
On: September 20, 2024 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

वर्धा : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील वर्धा येथे आले असतांना त्यांनी या सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीची भावना संपली आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. आता त्यांना गणपती बाप्पाचीही चीड येऊ लागली आहे. मी गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली होती, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रातील वर्धा येथील सभेत मोदींनी संबोधित केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. पंतप्रधान म्हणाले की, जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी/एसटीला दडपून ठेवले. त्यांना पुढे जाऊ दिले नाही. आमच्या सरकारने कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली. पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत एका वर्षात 8 लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पीएम मोदी म्हणाले की, ज्या पक्षाला आपल्या आस्था आणि संस्कृतीचा किंचितही आदर आहे तो कधीच गणपती पूजेला विरोध करू शकत नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेचा तिटकारा आहे. मी गणेशपूजनाच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत उठले. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध सुरू केला. वास्तविक, पंतप्रधान मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनासाठी गेले होते. ज्याला विरोधकांनी विरोध केला होता.

पंतप्रधान म्हणाले – महाराष्ट्रात अनेक दशके काँग्रेस आणि नंतर महाविकास आघाडी सरकारने कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद बनवण्याऐवजी त्यांना संकटात ढकलले, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले आणि भ्रष्टाचार केला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कचे काम सुरू झाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!