मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

“राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदानाचा बिगुल वाजला: राज्यात महायुतीकडे ६ जागा निश्चित !

By team
On: February 18, 2026 2:38 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागा समाविष्ट असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. एप्रिलमध्ये अनेक दिग्गज राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार: उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च, अर्जांची छाननी ६ मार्च , अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ मार्च, मतदान १६ मार्च, सकाळी ९ ते सायंकाळी ४, मतमोजणी १६ मार्च, सायंकाळी ५ पासून आणि निकाल लगेच जाहीर

महाराष्ट्रातील निवृत्त होणारे सदस्य:

महाराष्ट्र राज्याच्या कोट्यातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. हे खासदार आहेत:

शरद पवार, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान, धैर्यशील पाटील

महायुतीकडे संख्याबळ: महाराष्ट्र विधानसभेच्या प्रभावी संख्येप्रमाणे २८६ आमदार असून, दोन जागा रिक्त असल्यामुळे प्रत्यक्ष प्रभावी संख्या थोडी कमी आहे. तरीही एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३७ आमदारांचा कोटा आवश्यक आहे.

महायुतीकडे उपलब्ध संख्या:

भाजप: १३१

शिंदेसेना: ५७

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ४०

सात अपक्ष/लहान पक्षीय आमदारांचा पाठिंबा

एकूण २३५, ज्यावरून महायुतीकडे किमान ६ जागा निश्चित होण्याची शक्यता

राजकीय चर्चा अशी आहे की:

भाजप – ४ जागा लढवेल

शिंदेसेना – १ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १ जागा

या गणनेवरून महाराष्ट्रातून राज्यसभेवर महायुतीचे बलस्थळ अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment