---Advertisement---

गृहिणींचे दैनंदिन बजेट कोलमडले : भाज्यांचे दर कडाडले !

By team
On: July 11, 2025 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र घसरल्याचे दिसून येत आहेत.

अवघ्या दोन आठवड्यावर श्रावण महिना आला असल्याने बाजारात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन बजेटवर परिणाम झाला आहे. त्यातच सततचा पाऊस आणि त्यामुळे भाज्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आवक घटल्याने भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत तर कोथिंबीरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे बर्‍याच गृहिणी बाजारात गेल्यानंतर आवर्जून कोथिंबीर घेत आहेत आणि पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम कोथिंबीर भजी, कोथिंबीर वड्या करायला पसंती देत आहेत.

दरम्यान हे वाढलेले दर पाहता श्रावण महिना संपेपर्यंत म्हणजेच किमान एक ते दीड महिना तरी दरवाढीची ही स्थिती अशीच राहील असा अंदाज भाजी विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला की या दरम्यान येणार्‍या रानभाज्या अजून तरी पाहिजे तशा बाजारात दाखल झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेक नागरिक दैनंदिन भाज्यांचा सर्रास वापर करत आहेत. त्यातच पाऊस सुरू झाला असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे.

साहजिकच हे नुकसान होत असल्याने भाज्यांची मागणी तीच मात्र पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे वाढते दर पाहता गृहिणींच्या नियमितच्या बजेटवर परिणाम झाला असल्याचे भाजी विक्रेते सांगत आहेत.

टोमॅटो 250 रुपये, फ्लॉवर 300 रुपये, कोबी 180 रुपये, मिरची 500 रुपये, दुधी 200 रुपये, शेवगा 600 रुपये, शिमला 800 रुपये, आलं 300 रुपये, तोंडली 300 रुपये, शिराळे 500 रुपये, कारले 500 रुपये, वांगी 300 रुपये, गवार 650 रुपये

टोमॅटो 40 रुपये, फ्लॉवर 120 रुपये, कोबी 50 रुपये, मिरची 80 रुपये, दुधी 60 रुपये, शेवगा 120 रुपये, शिमला 120 रुपये, आलं 80 रुपये, तोंडली 120 रुपये, शिराळे 120 रुपये, कारले 120 रुपये, वांगी 80 रुपये, गवार 120 रुपये

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!